
उस्मानाबाद :- (श्रीकांत मटकिवाले)भारत देश हा अनेक जाती धर्माच्या नावाने ओळखला जाणारा बलाढ्य देश आहे, प्रत्येक धर्मात मानवतेला स्थान असुन सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे कार्य होत असते.उस्मानाबाद येथील मोहंमदीय खिरणी मळा मज्जीद मध्ये मज्जीद परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात शहरातील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते.मेळाव्यात नमाज पठण,मज्जीद मधील बाबींचा स्पिकर अन्य इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.बाहेर मज्जीद विषयी जे काही गैरसमज पसरविले जात आहे त्यावरती चर्चा झाली,मज्जीद कोण्या एका साठी नाही तर सर्व जातीधर्माच्या लोकासाठी आहे,मज्जीदचे दार सदैव उघडे असतात,मज्जीद मध्ये येणारा फकिर असेल या राजा तो समान आहे.औरंगाबाद,नांदेड हुन आलेले धर्म प्रचारक मौलाना यांनी मज्जीद बद्दल माहिती देत पवित्र कुराण मधील काहि श्लोकाची माहिती दिली.
पवित्र कुराण मधील काहि श्लोका वरती स्मरण होऊन मक्का हे शहर पृथ्वीच्या मध्यवर्ती भुखंडावर वसलेले असुन महंमद पैगंबर यांचा जन्म तिथेच झाला आहे.दादासाहेब जेठीथोर, पृथ्वीराज चिलवंत यांनीही मनोगत व्यक्त केले.गरज राहिल वास्तवतेची..भारतीय संविधान आपल्याला जगायला शिकविते, संविधानाचा गौरव म्हणुन मतदार जनजागरण समिती उस्मानाबादच्या वतीने भारतीय संविधान उद्देशिकाची प्रत आलेल्या प्रचारक मौलाना,मज्जीदचे व्यवस्थापक यांना देण्यात आली.यावेळी औरंगाबादचे प्रचारक मोहम्मद रईस भाई,नांदेडचे प्रचारक मोहम्मद मुसाद्दिक,दादासाहेब जेठीथोर,सिध्दार्थ बनसोडे,पृथ्वीराज चिलवंत, गणेश रानबा वाघमारे,निसार पटेल,कांबळे साहेब,आसेफभाई पठाण,ईलियास शेख,पुष्पकांत माळाळे,आनंद भालेराव,मेसा जानराव,शफिक शेख,नवाबोद्दीन मोमीण,मजीद पठाण,पोपट शिंगाडे,जियाऊद्दीन मणियार,अहेमद मौलाना अन्य इतर उपस्थित होते.