
विद्यार्थ्यांना संविधान समजणे काळाची गरज..( गणेश वाघमारे)
उस्मानाबाद 🙁 श्रीकांत मटकिवाले) भारतीय संविधान विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक आहे,ग्रंथोत्सव २०२२ साजरा होत असतांना ग्रंथ व वृक्ष दिंडीत भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करुनच दिंडीला सुरुवात करावी अशी मागणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुरवसे व जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या कडे मतदार जनजागरण समिती उस्मानाबादच्या वतीने केली होती.या दिंडीत अनेक शाळांचा समावेश होता,दिंडीची सुरुवात भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करुन झाली,दिंडीतील पालखीत भारतीय संविधान ग्रंथ ठेवण्यात आला होता.गरज राहिल वास्तवतेची,राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळे आपण आज येथे उभे आहोत,राज्यघटना आपण समजुन घेतली तर देश व देशातील लोकशाही टिकेल असे सुत्रसंचलनात मनोगत व्यक्त करण्यात आले,विस्तार अधिकारी जंगम यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन करीत त्यांच्यासह मान्यवर, विद्यार्थी शिक्षकांनी सामुदायिक वाचन केले.दिंडीत निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,तहसिलदार गणेश माळी,नायाब तहसिलदार राजाभाऊ केरुलकर,मतदार जनजागरण समितीचे अब्दुल लतिफ,गणेश रानबा वाघमारे अन्य इतर उपस्थित होते.