Spread the love


उस्मानाबाद :- ( जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत मटकिवाले) बेंबळी येथील सरपंच व ग्रामसेवकाने सन 2020 ते 2022 या तीन वर्षांतील कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत बेंबळी ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.बेंबळी ग्रामपंचायतला विविध योजनातून करोडो रुपये निधी प्राप्त झाला होता. दलित वस्ती सुधार योजनेतील पाणी पुरवठातील दोन लाख रुपये निधी मंजूर झाला परंतु त्यात कसलेही प्रकारचे काम न करता पैसे उचलून त्याचे काम दलित वस्तीत न करता इतर वस्तीत निधीचा खर्च केला आहे यामुळे दलित वस्तीलर अन्याय झाला आहे. विद्युतीकरणासाठी नऊ लाख रुपये प्राप्त असताना एकही विद्युत खांबावर लाईट न बसविता बिल उचलले.दलित वस्तीत कचराकुंडी न खरेदी करता खर्च दाखवून अपहार केला आहे.तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत हाय मस्त लॅम्प बसण्या करिता तीस लाख रुपये निधी मंजूर झाला परंतु हि कामे निकृष्ट दर्जाची अर्धवट झाले आहेत.या सर्व कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शासन व्हावे याकरिता बेंबळी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी दिनांक 19/ 12 /2022 रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषणास अनेक सामाजिक संघटना पक्ष पार्टी व नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!