Spread the love



उदगीर- (प्रतिनिधी ) आपल्या शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रात्र दिवस सेवा करुन समाजात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस बांधव काम करत असतात मात्र त्यांना राहण्यासाठी निवारा नव्हता जो होता तो मोडकळीस आलेला व दुर्गंधी चे साम्राज्य निर्माण करणारा होता.
या मुळे अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास धोका ही निर्माण झालेला होता..
त्या मुळे अनेक पोलिस कर्मचारी तिथे राहण्यास तयार नव्हते हिचं समस्या लक्षात घेऊन उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार.आणी. अ.भा.सेनेचे. लातुर जिल्ह्याचे जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ गायकवाड आणि अँड श्रवणकुमार माने . यांनी स.न.२०१५. मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच पोलिस महासंचालक मुंबई. जिल्हाधिकारी लातूर पोलिस अधीक्षक लातूर. उपजिल्हाधिकारी उदगीर. उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीर यांना वेळोवेळी पोलिस वसाहतीच्या निर्मिति बाबत निवेदन दिल्या मुळे अखेर त्याची दखल घेऊन तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव साहेब व सध्याचे आमदार संजय बनसोडे भाऊ यांनी पोलिस वसाहती साठी तब्बल अनेक कोठी रुपये मंजूर करुन घेऊन काही दिवसांपूर्वी पोलिस वसाहतीचे भुमीपजन करुन कामाला सुरुवात करण्यात आले यामुळे अनेक स्तरांतून व पोलीस कर्मचारी यांच्या कडून अ.भा.सेनेचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ गायकवाड व ऍड श्रवण कुमार माने यांचे आभार मानत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!