Spread the love

लातूर(प्रतिनिधी) :  येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नववीतील विद्यार्थी पुषण कुलकर्णी, तर प्रमुख पाहुणे म्हणून सायली राऊत व गायत्री जाधव या विद्यार्थीनींसह विद्यासभा संयोजक तथा उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे,पर्यवेक्षक संदीप देशमुख,पर्यवेक्षक बबन गायकवाड यांची मंचावर उपस्थिती होती.प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सायली राऊत हिने मनाेगत व्यक्त करताना म्हटले की, अवघ्या दीड दिवसाच्या शिक्षणातून त्यांनी विपुल साहित्याची निर्मिती केली. त्यांना प्रतिभाही लाभली होती.दलित,शोषित समाजाचं दुःख आपल्या साहित्यातून प्रभावीपणे त्यांनी मांडलं,म्हणूनच ते साहित्यसम्राट ठरले. दुसऱ्या प्रमुख पाहुण्या गायत्री जाधव हिने “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच “

अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची ओळख तिने ओघवत्या शब्दात करून दिली. 

     अध्यक्षीय मनाेगतात पुषण कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अण्णाभाऊंनी साहित्य निर्मिती केली. तळागाळातील समाजात जाणीवजागृती करण्याचे काम त्यांच्या साहित्याने केले.लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात फार मोठे योगदान दिले. त्यांनी घालून दिलेल्या चतु:सूत्रीमुळेच आपला भारत देश स्वतंत्र झाला, असे मत व्यक्त केले .     

         संगीत शिक्षक संतोष बीडकर व त्यांच्या  साधक विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊंच्या जीवन चरित्रावर पोवाड्याचे सादरीकरण केले.लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरही नाटिका सादरीकरण करून विद्यार्थी व शिक्षकांना मंत्रमुग्ध केले.   

     कलोपासक मंडळाच्या वतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व स्वागत अमृता केंद्रे हिने केले.सूत्रसंचलन भूमिका सावंत व उर्वी देशमुख हिने केले केले.

श्रुती पाटील हिच्या कल्याणमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!