Spread the love

लातूर जिल्ह्यात 17 ऑगस्ट रोजी 11 वाजता होणार जिल्हा क्रीडा संकूलात समूह 75 ची प्रतिकृती करून सामूहिक राष्ट्रगीत होणार ; जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालयातही होणार सामूहिक राष्ट्रगीत
 
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे नागरिकांनाही राष्ट्रगीत गायनासाठी आवाहन

लातूर दि.16 (प्रतिनिधी)  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य महोत्सवांतर्गत  “घरोघरी तिरंगा” व इतर उपक्रम आपण मोठ्या उत्साहात साजरे केले. याला जोडूनच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 17 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात सकाळी 11 वा. स्वराज्य महोत्सवाचा भाग म्हणून “समूह राष्ट्रगीत गायन” गायले जाणार आहे. जिल्हा क्रीडा संकूलात 75 ची प्रतिकृती करून सामूहिक राष्ट्रगीत होणार असून जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालयातही, सामाजिक संस्था, नागरिकही सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
स्वराज्य महोत्सवांतर्गत समूह राष्ट्रगीत गायनासाठी यशस्वी अंमलबजावणी व्हावी यादृष्टिने सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. हे समूह राष्ट्रगीत गायन 17 ऑगस्ट रोजी सकाळी बरोबर 11 वा. एकाचवेळी राज्यातील सर्व दूर्गम भागातील पाड्यांसह महानगरात गायले जाईल. यासाठी राज्यातील सर्व खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा / महाविद्यालय / शैक्षणिक संस्था / विद्यापीठे यामधील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग उत्स्फूर्त असणार आहे. सकाळी 11 वा. राष्ट्रगीताला सुरूवात होईल व 11.1 मिनिटामध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, हे शासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
 
समूह राष्ट्रगीत गायनाचा वेळी जाणते, अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याबाबत सर्व स्तरावर काळजी घेण्याचेही आवाहन शासनाने केले आहे. राज्यातील नागरिकांना दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. ते ज्या ठिकाणी असतील त्याठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचेही आवाहन शासनाने केले आहे. राज्यातील सर्व खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालय, केंद्र व राज्य शासनाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्गखोली किंवा हॉल या ठिकाणी एकत्रीत उपस्थित राहून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. ग्रामस्तरावर व शहरात वार्ड स्तरावर सर्व प्रशासकीय अधिकारी व  पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. यासाठी ग्रामविकास, पंचायतराज विभाग व नगरविकास विभाग यांनी सर्व समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!