Spread the love

चाकूर(प्रतिनिधी) 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. पाचशे वर्षांपासून प्रलंबित असलेला अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय मार्गी लावत भव्य मंदिराची उभारणी केली. जगात लोकप्रिय असलेले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भविष्यात देश सुरक्षित ठेवण्यासाठी भक्कम साथ देण्याची आवश्यकता आहे. देशहितासाठी लातुरकरांनी कायमच साथ दिलेली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, मनसे, रासप, महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भाजपाचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी केलेे.खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सोसायटी चौकात विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. व्यासपीठावर नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. डॉ.अजित गोपछडे, लोकसभा संयोजक माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, उमेदवार खा. सुधाकर शृंगारे, आ. बाबासाहेब पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके पाटील, डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर, अरविंद पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा सरचिटणीस भारत चामे, माजी सभापती अशोक केंद्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होणराव, लोकसभा प्रभारी राहुल केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना तावडे म्हणाले की, अर्थकारणामध्ये आपला देश अकराव्या क्रमांकावर होता तो पाचव्या क्रमांकावर आणुन मोदी यांनी देशातील गरीब जनतेची काळजी घेतली. देशातील एकही व्यक्ती उपाशीपोटी राहू नये यासाठी मोफत अन्यधान्याची व्यवस्था केली. कोवीड काळात मोफत लस देऊन लाखो लोकांचे प्राण वाचविले. जनतेची काळजी घेणार्‍या नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही तावडे यांनी केले.यावेळी मार्गदर्शन करताना आ. निलंगेकर म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात देशातील गोरगरीब, शेतकरी, युवक आणि महिलांचा सर्वांगीण विकास झाला आहे. परराष्ट्रीय संबंध, संरक्षण या विषयातही देश स्वयंपूर्ण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रात भाजपा सरकार निवडून द्यावे, असे आवाहन आ. निलंगेकर यांनी केले.या सभेस विश्वजित गायकवाड, चाकूर तालुकाध्यक्ष वसंत डिगोळे, माजी सभापती रोहिदास वाघमारे, जीवनकुमार मद्देवाड, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस रेखाताई तरडे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, हणमंत पाटील, उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार, सज्जनकुमार लोणाळे, नितीन रेड्डी, मिलिंद महालिंगे, अंकुश जनवाडे, मेघराज बाहेती, राजकुमार मजगे, जिल्हा विस्तारक सिद्धेश्वर पवार, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे, हणमंत पाटील, अ‍ॅड. युवराज पाटील, बबलू पठाण, तुकाराम मद्दे, अशोक शेळके, रमेश पाटील, श्रीकांत देशमुख, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा मनिषा नवणे, भरत गुरमे यांच्यासह चाकूर – अहमदपूर तालुक्यातील मतदार व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!