
धाराशिव : ( श्रीकांत मटकीवाले) दि.23/2/2023 महार-मांग वतनदार परिषदेच्या 82 व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने मौजे कसबे तळवळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) आणि फुले-शाहू- आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था,कसबे तडवळे च्या संयुक्त विद्यामाने 22/23 फेब्रुवारी 2023 रोजी भरगच्च असे कार्यक्रम यशस्वी-रित्या संपन्न झाले. याबाबत सविस्तर होत असे की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे व फुले,शाहु,आंबेडकर बहुद्येशिय सामाजिक संस्था क.तडवळे च्या संयुक्त विद्यामाने,दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी रेल्वे स्टेशन येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या बैलगाडी मध्ये बसून आले होते,त्या बैलगाडी सह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राची भव्य अशी मिरवणूक सकाळी 11 वाजता,सामाजिक न्याय विभागाचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काढण्यात आली.या भव्य अशा रॅलीचा समारोप गावातील जयहिंद महाविद्यालयातील भव्य अशा प्रांगणात करण्यात आला. यावेळी माजी मंञी,चंद्रकांत हांडोरे व इतर मान्यवरांनी महार-मांग वतनदार परिषदेच्या 82 व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच माजी मंञी,चंद्रकांत हंडोरे,पार्टीचे विभाग प्रमुख सत्येंद्र चव्हाण,प्रकल्प अधिकारी हणुवते साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आदर्श शिक्षक आणि विविध खेळ आणि शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला.यावेळी नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे,भारतीय बौध्द महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच सायंकाळच्या सञामध्ये,सायंकाळी ठीक सात वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये प्रसिद्ध व्याख्याते, सुकुमार कांबळे ( संस्थापक अध्यक्ष डी पी आय ) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महार- मांग वतनदार परिषद काल- आज आणि उद्या या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुकुमार कांबळे,आमदार कैलास पाटिल,आर.पी.आय आठवलेचे संजय बनसोडे यांच्यासह अनेक विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती.या कार्यक्रमांमध्ये सुकूमार कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,येणारा काळ प्रचंड घातक असा काळ आहे.महार-मांग परिषदेच्या ऐतिहासिक कार्याला यशस्वी करण्यासाठी आजच्या काळामध्ये पूर्वाश्रमीचे महार आत्ताचे बौद्ध व मांग समाजाने एकत्रितपणे सामाजिक,धार्मिक व राजकीय लढाईमध्ये पावले उचलने गरजेचे आहे,असे सांगितले.तर याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्यातील होतकरू,निष्ठावंत,प्रामाणिक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक कसबे तडवळाच्या आंदोलनामध्ये सातत्याने सक्रिय असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक पक्ष संघटना, सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचाही सन्मान-चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी तत्काळात महार मांग-वतनदार परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, अशा सर्व कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या वारसदारांचाही सुकुमार कांबळे व आमदार कैलास पाटिल यांच्या हस्ते भव्य असा सत्कार करण्यात आला.या परिसंवादा नंतर शेवटच्या सत्रामध्ये सुप्रसिद्ध गायक सदाफुले सोलापूर,यांचा भव्य असा भीमगीताचा कार्यक्रम सुरू करण्यात येऊन उपस्थितांनी भिमगीतांचा आनंद घेतला.तर दुसऱ्या दिवशीच्या म्हणजेच 23 फेब्रुवारी 2023 रोजी च्या कार्यक्रमांमध्ये सकाळच्या सञात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित माध्यमिक विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या स्पर्धकांना त्या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तर सायंकाळच्या सञामध्ये,सायंकाळी सात वाजता,महार-मांग वतनदार परिषदेच्या 82 व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने अभिवादन सभेचे आयोजन ही करण्यात आले होते.या अभिवादन सभेसाठी भारतीय दलित कोब्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,भाई विवेक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.या अभिवादन सभेमध्ये भाई विवेक चव्हाण आणि इतर मान्यवर मंडळींनी आपली मते व्यक्त केली. याप्रसंगी बोलताना भाई,विवेक चव्हाण यांनी कसबे तडवळा येथे नियोजित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या अनुषंगाने उपस्थितांसोबत संवाद साधत लवकरात लवकर येणार्या एप्रिल महिन्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले पाहिजे असे सांगितले.यावेळी युवा उद्योजक देवदत्त मोरे,तानाजी जमाले,प्रतामसिॅह करंजकर यांनी ही आपली मते मांडली.तर अभिवादन सभेच्या शेवटी संस्थेच्या वतीने महत्वपुर्ण ठराव घेवुन त्याचे सामुहिक वाचन करत टाळ्याच्या गजरात मंजुर केले. तसेच या अभिवादन सभेच्या कार्यक्रमानंतर भिमशाहिर,राहुल शिंदे पुणे (पुण्याचा राघु) यांचा भिमशाहिरी जलसाच्या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन फुले शाहू आंबेडकरी संस्थेचे बहुउद्देशीय सामाजिक संस्था व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते दोन्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक,विजय अशोक बनसोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक फुले, शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयशील भालेराव यांनी केले.या महार-मांग वतनदार परिषद 82 व्या वर्धापण दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार्टीचे सर्व समता दूत आणि फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था कसबे तडवळेचे चंदू भालेराव, विपुल भालेराव,सुरज भालेराव,प्रा.विजय भालेराव,ग्रा.प.सदस्य धनाजी भालेराव,संताजी निकाळजे,बाळासाहेब सोनवणे,बाबासाहेब भालेराव, जगन्नाथ भालेराव,विलास भालेराव,वामन सोनवणे,सुधाकर निकाळजे,मंजु गायकवाड,रंजना सोनवणे,कांचन भालेराव, इत्यादी अनेक भीमसैनिकांनी परिश्रम घेतले.तसेच या महार-मांग वतनदार परिषदेच्या 82 व्या वर्धापण दिनाच्या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमास जिल्हाभरातुन अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.तर दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमास ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.