खासदार श्री सुधाकर शृंगारे.
लातुर-( प्रतिनिधी)–भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात आज (ता.1) लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प हा शेती,शेती पूरक व्यवसाय, महिला सबलीकरण आणि समाजातल्या शेवटच्या माणसा पर्यन्त म्हणजे सामान्य गरीब माणसाला समर्पित असलेला अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे.— अर्थसंकल्पात प्राधान्याने शेती,शेती पूरक व्यवसाय यांना भरीव निधी देण्यात आला आहे. ग्रीन एनर्जीसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी तरतूद करण्यात आली आहे. पशु संवर्धन, मत्स्य व्यवसाय, कापूस निर्यात यासाठी देखील भरीव निधी देण्यात आला आहे. महिला सबलीकरणासाठी महिला बचतपत्र योजना नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. तर 81 लाख महिला बचत गटांना कर्जरूपी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. हा अर्थसंकल्प हा गरीब सामान्यांचे स्वप्न साकार करणारा आहे. रोजगार निर्मिती बरोबरच उद्योजक निर्मितीसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे.त्यामुळे हा अर्थसंकल्प हा गरीब ,सामान्य शेतकरी आणि महिला यांचे स्वप्न साकार करणारा ठरेल अशी प्रतिक्रिया खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे.