
रेणापूर(प्रतिनिधी)- जात,धर्म, राजकीय पक्ष यापलीकडे जाऊन सर्वांशी मिळून मिसळून वागणारे,भाजपाचे नि:स्वार्थी,निष्ठावंत कार्यकर्ते स्व. धनंजय बाबुराव म्हेत्रे यांना बुधवारी (दि.३० नोव्हेंबर)श्री रेणुकादेवी मंदिर सभागृहात सर्वपक्षीय सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी विविध पक्षातील,विविध क्षेत्रातील मान्यवरांसह व्यापारी,सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे धनंजय म्हेत्रे यांचे अल्प आजाराने निधन झाले.ही घटना समजताच रेणापूरसह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.सर्वांसोबत मिळून-मिसळून राहणारे धनंजय म्हेत्रे यांनी अनेकांच्या सुख- दुःखात सक्रिय सहभागी होऊन काम केल्याने प्रत्येकाला ते कुटुंबातील सदस्य वाटत होते. सर्वांच्या हक्काचा माणूस या भावनेतून स्व.धनंजय म्हेत्रे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेत मल्लिकार्जुनप्पा हलकुडे,अँड.दशरथ सरवदे,ईश्वर गुडे,संतोष गिरवलकर,अभिषेक आकनगिरे,सचिन दाने,अनिल कुटवाड,चंद्रकांत कातळे, बालाजी कदम,हरिभाऊ साबदे, सिद्धेश्वर मामडगे,अभिजीत मद्दे, रवी चव्हाण,देविदास कातळे, प्रशांत आकनगिरे,दत्ता सरवदे, वीरेंद्र चौव्हाण,अतुल कातळे यांनी मनोगत व्यक्त करून म्हेत्रे यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. आयुष्यभर अनेकांसाठी धावून जाणाऱ्या धनंजयच्या परिवारास आधार देणे,हीच खरी श्रद्धांजली असल्याचे मान्यवरांनी बोलून दाखविले.सभेचे सूत्रसंचलन अमृतेश्वर स्वामी यांनी केले. या कार्यक्रमास रमाकांत वाघमारे,सय्यद मतीनअली,डॉ.बाबासाहेब घुले,जयप्रकाश हलकुडे,जनार्धन माने,एकनाथ आकनगिरे,बापूसाहेब कुलकर्णी, वसंत करमुडे,अनुसया फड, विजयकुमार एकुरके,सचिन मोटेगावकर,उज्वल कांबळे, ज्ञानोबा भिसे,श्रीकृष्ण पवार, गोविंद दूड्डे,दिलीप आकनगिरे, सतीश मोरे,युवराज पाटील, अप्पासाहेब हलकुडे,त्रिंबक काळे,राजाभाऊ हलकुडे,राजू पुनपाळे,राजू धर्माधिकारी,अच्युत कातळे,महेश गाडे,विजय चव्हाण,गणेश चव्हाण,श्रीपाल बस्तापुरे,श्रीमंत नागरगोजे,राम पाटील,राजन हाके,श्रीकांत सूर्यवंशी,अंतराम चव्हाण,भावे गुरुजी,सतीश गोडभरले,हरिदास पांचाळ, हनुमंत पवार,सचिन इगे, नरसिंग येलगटे, मारुती गालफाडे, उत्तम घोडके, गोविंद राजे,नंदू बंडे, प्रशांत बंडे, हनुमंत भालेराव, कोंडीराम काळे,राजू अत्तार प्रवीण शिंदे,रखमाजी जोगदंड, खैसरभाई सय्यद,गणेश माळेगावकर,बाळू आकनगिरे, किशोर चक्रे,आर.डी.अपसिंगेकर, लक्ष्मण दळवी,वैजू कातळे,महेश कलशेट्टी,धनंजय भांबरे,सचिन शिरसकर,पप्पू कुडके यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी,व्यापारी सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.