Spread the love

उस्मानाबाद – (श्रीकांत मटकीवाले ) तालुक्यातील तावरजखेडा ग्रामपंचायतीमध्ये १४ व १५ वित्तीय योजनेच्या कामात व इतर योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याबाबत  ग्रा. सदस्य समाधान फेरे यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले आहे 

या निवेदनात म्हटले आहे की जुन्या दलित वस्तीतील समाज मंदिराचे काम बेसमेंट लेवल असून याचा निधी ७० टक्के उचला आहे याचा कालावधी चार वर्षे झाले आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक शौचालय न बांधताच रक्कम उचली आहे व त्या कामातील लाभार्थींची नावे कागदावरच आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेत मुरली फेरे यांच्या शेतात विहीर घेण्यात आली आहे मात्र या विहिरीचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नाही व बऱ्याच बाबी न करता रक्कम उचली आहे सार्वजनिक सिंचन विहीर भास्कर पिंपरे यांच्या शेतात एमआरईजीएस अंतर्गत घेण्यात आला ही विहीर फक्त दहा फूट खोलीचे काम करून मजुराचे मस्टर भरून ५० टक्के रक्कम उचली आहे. १४ व १५ व्या वित्त आयोगातील आराखड्यातील काही कामे निकृष्ट करण्यात आली व काही कामे न करताच उचली आहेत तसेच घरपट्टी, नळपटी वसुली करून ग्रामपंचायतीच्या खात्यात रक्कम जमा केली नाही व अपहार करण्यात आले आहे ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामात भ्रष्टाचार झाला आहे या सर्व कामाची चौकशी करावी.

तसेच तहसील कार्यालयाच्या लोकशाही दिवशी निवेदन दिले होते परंतु काही कारवाई झाली नाही गटविकास अधिकारी पं समिती यांनी  सदर तक्रारी बाबत चौकशी अधिकारी यांची नेमणूक करून सात दिवसात अहवाल मागिवला होता परंतु यास ६७ दिवस झाले असून चौकशी अधिकारी यांनी कोणतीही चौकशी केली नाही या निवेदनात म्हटले आहे.

ग्रामपंचायत मधील वरील सर्व कामात झालेला भ्रष्टाचार, कामाची गुणवत्ता, गैरव्यहार, अपहार, अनियमिता तपासुण व चौकशी करुन संबंधीत ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्थरावरील तांत्रीक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे व शासनाचा वाया गेलेला निधी वसुल करावा अन्यथा ३० जानेवारी पासुन आमरण उपोषणाचा इशारा ग्रा.सदस्य समाधान फेरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!