खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश लातूर-(प्रतिनिधी ) मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामधील अभियांत्रिकी विभागात १८१ जागा भरण्यात येणार आहेत , विशेष म्हणजे या जागा ह्या देशातल्या विविध भागात रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमधून भरण्यात येणार आहेत . स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या खासदार सुधाकर शृंगारे यांच्या मागणी नंतर रेल्वे विभागाने लातूरसह मराठवाड्यातल्या कर्मचाऱ्यांना बदलीवर कोच कारखान्यात नियुक्ती मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे . त्यासाठी रेल्वेने परिपत्रक काढले आहे . अशी माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी म्हंटले आहे. –मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात अभियांत्रिकी विभागातील १८१ जागा भरण्यात येणार आहेत . या जागा भरताना लातूरसह मराठवाड्यातील रहिवाशी असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर येण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लातूरसह मराठवाड्याच्या अनेक भागातील कर्मचारी रेल्वेच्या विविध विभागात कार्यरत आहेत ,त्यांना आता मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात बदलीवर येण्यासाठी अर्ज करता येणार आहेत . एसएसइ-मेकॅनिकल-एल-०७,०२, जेई-मेकॅनिकल -एल-०६,७१. मिनिस्ट्रियल- ०-एसएल-६,०२. टेक्निकल-मेकॅनिकल विभाग-एल-०५,१०६ अश्या १८१ जागा भरण्यात येणार आहेत. प्रतिनियुक्ती देताना सेवा जेष्ठता आणि पात्रता पडताळण्यात येणार आहे . – मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे विभागाकडे केली आहे . त्यामुळे या जागा भरताना रेल्वेतील स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामुळे लातूरसह मराठवाड्यातल्या युवकांच्या हाताला काम मिळेल अशी अपेक्षा आहे . रेल्वे कोच कारखान्यावर आधारित अनेक छोट्या आणि मोठ्या उद्योगांनाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे . मध्य रेल्वेने परिपत्रक काढून सर्व विभागांना प्रतिनियुक्तीवर कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे कळवले आहे . देशातल्या अनेक भागात रेल्वेमध्ये नोकरीत असलेल्या लातूर आणि परिसरातल्या कर्मचाऱ्यांना मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात प्रतिनियुक्तीवर येण्याची हि चांगली संधी उपलब्ध झाली आहे . सध्या १८१ कर्मचारी अभियांत्रिकी विभागात भरण्यात येणार असल्याचे परिपत्रक रेल्वेने जारी केले आहे . अशी माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी दिली आहे .