Spread the love

धनगर समाज मेळाव्यात आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन, महायुती सरकारला घेतला समाचार.

लातूर (प्रतिनिधी-)सरकार हे समाजातील प्रत्येक घटकासाठी असले पाहिजे. परंतु महायुतीचे सरकार समाजाच्या कोणत्याही घटका सोबत नाही. शेतीमालाला भाव नाही, सोयाबीन खरेदी केंद्र बंद आहेत, आरक्षण देतो म्हणतात देत नाहीत, आरक्षण देऊ म्हणून मते मागतात. वापरा आणि फेकून द्या अशी या महायुती सरकारची नीती आहे. या घर फोडू सरकारपासून आपले घर वाचवा असे शब्दांत लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला.

लातूर येथे आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे होते. व्यासपीठावर अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, माजी आमदार रामहरी रूपनवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर, आबासाहेब पाटील, शाम भोसले, अॅड. दीपक सूळ, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, महेंद्र भादेकर, संभाजी सुळ, एकनाथ पाटील, शेषेराव हाके, चंद्रकांत देवकते, शिखंडी हरवाडीकर, रमेश सोनवणे, कैलास होळकर, विष्णू धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार धिरज देशमुख म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारावेळी बोलताना मी म्हणालो होतो की, माझ्या विजयाच्या गुलालात तुम्ही भंडारा मिसळा. आपण लोकसभेत आशीर्वाद दिला. आता विधानसभेत ही माझ्या विजयाच्या गुलालात आपण भंडारा मिसळावा, असे नम्र आवाहन त्यांनी उपस्थित समाज बांधवांना केले.

राज्यातील जनतेला महाविकास आघाडी सरकार हा एक पर्याय आम्ही दिला होता. कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान, कोरोना काळातील महाविकास आघाडीचे काम जगजाहीर आहे. समाजाला संघटित करण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले. महाविकास आघाडीस आपण मतदान करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

महायुतीचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे
माजी कृषी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले. महायुतीचे सरकार हे घटनाबाह्य असून तोडमोड करून सत्तेत आलेले हे सरकार आहे. या सरकारला आपण वेळीच हद्दपार करण्याची गरज आहे. आता या सरकारचा निकाल येणाऱ्या वीस तारखेला आपण द्यायचा आहे, असे सांगून धनगर समाज हा मेहनती, प्रामाणिक पण थोडा भोळा आहे. फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा असा सल्लाही त्यांनी दिला.

आम्ही धनगर समाजाला सन्मान दिला. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, महापौर, संचालक असे पदे देऊन सन्मान केलेला आहे. काँग्रेस पक्षाचा हात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेची मशाल यांना मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

महायुतीने जातीपातींमध्ये भांडणे लावली- राजे भूषणसिंह महाराज
धनगर समाज हा धनाचा आगार आहे. लातूर आणि बारामतीमधील राजकारणामध्ये शिस्त आहे. आपले कुटुंब आपल्यासाठी लढतोय अशा कुटुंब प्रमुखाला आपण विजयाचा भंडारा लावावा, असे सांगून जो समाज बांधवांना सोबत घेऊन जातो त्याच्यासोबत आपण राहिले पाहिजे.

घोंगडी व काठी धनगर समाजाची अस्मिता आहे, आमची मार्गदर्शक आहे. महायुती सरकारने विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, शैक्षणिक सवलत, महामंडळ, घरकुल, आरक्षण देतो म्हणून मते घेतली. पण त्यांनी काहीच दिले नाही. त्यांना हद्दपार करा. महायुतीने फक्त जातीपातीमध्ये भांडणे लावली आहेत. रोजगार, शिक्षण, महिला सक्षमीकरण यासाठी स्वाभिमानी असणारे राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपण आपली ताकद उभी करावी, असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले.

धनगर आरक्षणास खोडा घालणाऱ्यांना धडा शिकवा- सक्षणा सलगर

आपण सुसंस्कृत नेतृत्वाला निवडून द्यावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेहमी म्हणतात की, माझे आवडते मुख्यमंत्री हे विलासराव देशमुख होते. आदरणीय लोकनेते विलासराव देशमुखसाहेब नेहमी म्हणायचे की काँग्रेस एक चळवळ आहे. सगळे संपतील पण काँग्रेस संपणार नाही, असे सांगून या निवडणुकीत घोंगडी व काठीची ताकद दाखवा आणि खोके सरकारला हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले.

याप्रसंगी माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी धनगर समाजाचा इतिहास सांगितला. लातूरच्या नेतृत्वाने धनगर समाजांना समाजाला सन्मान दिला असल्यांचे सांगून धनगर समाजाच्या आरक्षणास देवेंद्र फडणीस यांचा विरोध असल्याची टीकाही त्यांनी याप्रसंगी केली. महाराष्ट्रात दोनच छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे छत्रपती यशवंतराव होळकर आणि हा आपला इतिहास टिकवायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केले.

यावेळी भाऊसाहेब हाके, रामकिसन मदने, दिलीप गोटके, गुंड्डरगे, शिवाजी भिसे, रामभाऊ माने, कविता वाडेकर, बालाजी सुरवसे, बालाजी वाघमारे, बालकृष्ण धायगुडे, जगदीश माळी, शुभम पडूळकर, बालाजी पांढरे, रमेश सुरवसे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!